Google search engine
Home Breaking News आपल्या देशात भारतीय संविधान विषयी प्रचंड अज्ञान भरलेले आहे, घटनेनुसार नागरिक यांची...

आपल्या देशात भारतीय संविधान विषयी प्रचंड अज्ञान भरलेले आहे, घटनेनुसार नागरिक यांची अधिकार व कर्तव्य बाबत एक तर ज्ञान नाही,

130

*आणि ज्यांना ज्ञान आहे ते पुढाकार घेऊन प्रबोधन करत नाही,🙊🙈🙉 चुपचाप बसून पाहत आहेत*

*भारत सरकारने,व शासनाने भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार पाहिजे त्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रेस मिडीया द्वारे आजपर्यंत केलेला नाही,ही शोकांतिका आहे*
*भारतीय संविधानातील अनुच्छेद ५१क.क.मध्ये १ते११ कर्तव्य नागरीकांना दिलेले आहे,व ते बंधनकारक आहे.*
*भारतीय संविधानाचे रक्षण करणे, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत,यांचे रक्षण करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करणे,हे नागरिक म्हणून कर्तव्य आहे*
*मात्र आज देशात वेगळेच चित्र आहे.*
*भारतीय संविधान किती ताकदवान आहे,हे तलाठी विनोद खोब्रागडे वरोरा चंद्रपूर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारताला दाखवून दिले आहे*
*जेव्हा एक तलाठी विनोद खोब्रागडे वरोरा चंद्रपूर हे विद्यमान जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना अटक वॉरंट काढुन थेट दिल्लीत घेऊन जातो,*
*असे उदाहरण आजपर्यंत भारताच्या इतिहासातील पहिले उदाहरण आहे.*
*एवढेच नाही तर तलाठी विनोद खोब्रागडे यांनी या पुर्वी सुद्धा तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा वर त्यांच्या समक्ष CBCID चौकशी थेट दिल्लीतुन बसविले, असे उदाहरण आजपर्यंत भारताच्या इतिहासातील पहिलेच उदाहरण आहे.*
*एवढेच नाही तर, विनोद खोब्रागडे तलाठी यांनी अनेक सनदी IAS अधिकारी,SDM, तहसीलदार,व अनेक कंपन्या वर फौजदारी कारवाई केली आहे,व FIR दाखल केले आहे,* *आणि आजही अनेक सनदी अधिकारी यांचावर फौजदारी अट्रासिटीचा केसेस न्यायालयात दाखल आहेत.*
*भारतात, महाराष्ट्रात, कुठेही आपल्या समाजावर अन्याय,अत्याचार झाला,व धार्मिक भावना दुखावल्या व ते इलेक्ट्रॉनिक मिडियावर प्रसिद्ध झाले तर कुनाची वाट न बघता तात्काळ त्यांचावर फौजदारी तक्रार वरोरा पोलिस ठाण्यात विनोद खोब्रागडे दाखल करत असतो.*
*रामदेव बाबावर FIR प्रकरण असो, दिल्लीत संविधान जाळणारे असो, भिमा कोरेगाव प्रकरण असो, अंबाझरी नागपूर प्रकरण असो,साई वर्धा पावर कंपनी व इतर कंपन्या असो, कर्नाटक एम्टा कोलमाईन्स लि.कंपनी असो, चंद्रपूर शहरातील अनेक बिल्डर असो, मानीकगड सिमेंट कंपनी असो,की WCLअसो, इतक्या साऱ्या कंपन्या व अधिकारी, आणखी बरेच आहेत,यांच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करु शकतो,व करून दाखविले आहे.*
*हे सर्व मी का लिहीत आहे,???व का सांगत आहे??????*
*हे सर्व मी भारतीय जबाबदार नागरिक,व भारतीय संविधानाचे अभ्यासक म्हणून, त्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी केली आहे.*
*म्हणूनच मी अधिकार वाणीने बोलत असतो, लिहीत असतो, फोकनाळ भाषणे देत नसतो,हे लक्षात घ्या.*
*म्हणून भारतीय नागरिकांनी भारतीय संविधान वाचुन त्याची अंमलबजावणी करावे.व अनुभव घ्यावा.*
*थोडक्यात भारतीय संविधानाची ओळख*
*दिनांक २६/नोव्हेंबर १९४९ भारतीय इतिहासातील महत्वाचा दिवस आहे.*
*आम्ही भारतीय लोकांनी स्व:तासोबत एक फार मोठ्ठी कमिटमेंट केली आहे.*
*आम्ही न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही सर्व मुल्ये ज्या देशात नांदतात असा भारत देश घडविण्याचे,अशा राष्ट्रबांधनीचे स्वप्न पाहिले,व ते स्वप्न भारतीय संविधानाच्या स्वरूपात, लेखी स्वरूपात नोंदविले.*
*थोडक्यात काय तर आम्ही “रुल ऑफ लाॅ “नेच म्हणजे कायद्याच्या राज्याने चालण्याचे ठरविले*
*आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे, मनमानीचे नाही*
*भारतीय संविधानाने मा. सुप्रीम न्यायालय,व मा. उच्च न्यायालय,यांची सुद्धा निर्मिती केली आहे*
*संविधानीक पदावर बसलेले सनदी अधिकारी व इतर अधिकारी यांनी, असंविधानीक कामे करुन ,आपली प्रतिमा न्यायालयात मलीन होनार नाही,यांची खबरदारी घ्यावी*
*नैसर्गिक न्याय तत्वाचे नेहमीच पालन करावे.*
*भारतीय संविधानातील अनुच्छेद* *१,१३,१४,१५,१६,
१७,१९,२०,२१,२५,३२,५१क,क,७७,
१६६,१४१,३४०,
३४१,३४२,
*यावर समाज माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मिडिया, प्रेस,मीडियाचा माध्यमातून भारतीय संविधानाचे प्रबोधन करावे,व अंमलबजावणी करावे.*
*आता जास्त लिहीत नाही*
*मिशन इंडिया टी. व्ही.च्यानलवर भारतीय संविधान विषयावर आयु.विनोद खोब्रागडे यांची विशेष मुलाखत दिनांक २६/नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहे, अवश्य बघा,व आपली प्रतिक्रिया कळवा,*
*धन्यवाद, जयभीम,जय संविधान*
*26/नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा, मंगलकामना 🌹🙏🎂🌹🙏🎂🌹🙏🎂🌹🙏🎂🌹🙏🎂🌹🎂 शुभेच्छुक आपला अनुयायी
विनोद खोब्रागडे वरोरा चंद्रपूर*
*मो.९८५०३८२४२६*
*मो‌.८३२९४२३२६१*