✍️भिमाकोरेगाव प्रकरणात,मुख्य आरोपी महसूल प्रशासनच आहे.तरीही ते आरोपी मोकळे कसे आहेत.????

49

*( श्री विनोद खोब्रागडे दबंग पटवारी यांच्या कडून साभार प्राप्त )

दिनांक 06/25/2018 ही तारीख टाकून व फेरफार घेऊन 7/12 मध्ये विजयस्तंभ नावात फेरबदल करुन जयस्तंभाकडे असे 7/12 वर कसे लिहीले????,आता 25 वा महीना महसूल अधिकारी यांनी आनला कुठुन.?????आणि भोगवटदार मालक जयस्तंभ नावाने 7/12 असतानां जयस्तंभाकडे लिहिले कसे???????अखेर दिनांक 06/07/2023 रोजी,वरोरा येथे, कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी साहेब प्रथम श्रेणी वरोरा यांचा न्यायालयात, भिमाकोरेगाव मौजा पेरणे तालुका हवेली जिल्हा पुणे येथील “विजयस्तंभ” जयस्तंभ” प्रकरणात फौजदारी पीटीशन महसूल अधिकारी विरुद्ध दाखल झाली. पीटीशन दाखल करनारा खुद्द दबंग तलाठी विनोद खोब्रागडे हेच आहे.मुख्य आरोपी श्री.सौरभ राव मा.विभागीय आयुक्त पुणे,श्री.डॉ.अजय देशमुख मा. जिल्हाधिकारी पुणे,श्री.संजय आसावळे उपविभागीय अधिकारी हवेली,श्री.किरण सुर्यवंशी तहसीलदार हवेली,श्री.किशोर शिंगोटे मंडळ अधिकारी,व श्री.स्वप्नील सुरेश पटांगें तलाठी पेरणे या महसूल अधिकारी विरुद्ध फौजदारी पीटीशन दाखल केली आहे.*
*फौजदारी पीटीशन क्रमांक रजिस्टर 142/2023 नुसार दाखल झाली आहे.*
*फिर्यादी विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक यांनीच पीटीशन दाखल केली आहे.*
*सविस्तर असे की,*
*भिमाकोरेगाव येथे 205 वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने महार बटालियन यांनी दिनांक 01/01/1818 मध्ये युद्ध जिंकल्यामुळे शहीद शुरविरांच्या नावाने विजयस्तंभ बांधून त्यांची,म्हणजे शहीदांची नावे कोरुन ,जवळपास परीसरातील 200 एकर जागा ईनाम दिली.*
*मात्र 99% जमीनीवर अतिक्रमण झाले.त्यापैकी*
*मौजा पेरणे तालुका हवेली जिल्हा पुणे सर्वे नंबर 1033 हे.आर.3.86 भोग वर्ग 1 ही संपूर्ण जमीन विजयस्तंभ च्या नावाने होती व आहे.*
*दिनांक 01/01/1927 पासून दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्या विजयस्तंभाला मानवंदना देन्यासाठी जात होते,तेव्हापासुन आज पर्यंत लाखो अनुयायी दरवर्षी त्या ठिकाणी मानवंदना देन्यासाठी जातात.हे सर्व महसूल प्रशासनाला माहिती असुनही त्यांनी जानीवपुर्वक विजयस्तंभ या नावाने 7/12 वर नोंद घेतली नाही.ऐवढेच नाही तर या महसूल प्रशासनाने बदमाशकी करुन, “विजयस्तंभ “नावा ऐवजी “जयस्तंभाकडे”अशी 7/12 वर बोगस नोंद घेतली.*
*व पीक पेरा मध्ये संपूर्ण जमीन बाजरी,मक्का,पपई,ची नोंद घेतलीच कशी.?????*
*ज्याअर्थी फेरफार क्रमांक 6053 व 6070 ज्या दिवशी नोटीस काढली, त्याअर्थी त्याच दिवशी त्या नोंदी प्रमानीत केलेच कसे.????? त्याचप्रमाणे तलाठी आरोपी यांनी फेरफार क्रमांक 6070 दिनांक 06/25/2018 ला नोंद घेतो,व आरोपी मंडळ अधिकारी त्याच दिवशी दिनांक 06/25/2018 ला फेरफार पास करतोच कसा.???????? 25 वा महीना या दोन्ही अधिकारी यांनी आणला कुठुन????असा प्रश्न निर्माण झाला आहे. ?*
*ही सर्व बोगस कामे महसूल प्रशाषणाने केली असल्यामुळे भारतीय दंड संहिता 1860 चा me कलम 120ब,420,465,468,*
*470,471,505 अ, 505ब, 153ब,153क, 505 (2) 298 कलमानुसार व अँट्रासिटीचा कलमा नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यास फौजदारी पीटीशन आज वरोरा न्यायालयात दाखल केली.*
*आरोपी यांनी आपल्या कर्तव्यात जाणिवपुर्वक कसुर केला आहे ? म्हणूनच ते शिक्षा व दंडास पात्र आहेत.*
*प्रथम पोलीस प्रशाषण ठाणेदार यांना,विनोदकुमार खोब्रागडे यांनी गंभीर रिपोर्ट दिली.नंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना रिपोर्ट दिली.त्यांनी CRPC कलम 36, व 154 (3) नुसार ठाणेदाराला आदेश,व निर्देश देने आवश्यक होते.*
*त्यांनी सुद्धा आपल्या कर्तव्यात जाणिवपुर्वक कसुर केला आहे.*
*म्हणून ठाणेदारावर सुध्दा CRPC,कलम 166 अ नुसार फौजदारी कारवाई करावे असे न्यायालयात सांगितले.*
*एक लक्षात घ्या,आपले लोक,व नेते लोक, आंदोलन करतात,मोर्चे काढतात,निवेदन देतात,*
*फोटो काढुन प्रसिद्ध मिळवतात,व घरी जाऊन विसरून जातात,असे करू नये,समाजाने 24 तास व 365 दिवस जागृत राहायला पाहीजेत.*
* मी मागील अनेक वर्षांपासून अनेक प्रकरणात अनेक कंपन्या,अनेक वरिष्ठ अधिकारी,यांचावर फौजदारी कारवाई केली आहे.*
*नुकतेच अंबाझरी नागपूर येथील 20 एकरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक बेकायदेशीर पाडल्यामुळे मंत्र्यासह ,सचिवासह,
विभागीय आयुक्त न्यायालयात आरोपी म्हणून हजर झाले आहे.त्या प्रकरण वरोरा न्यायालयात 18/07/2023 ला आर्गुमेंट आहे.*
*भिमाकोरेगाव या प्रकरणात सुद्धा फौजदारी पीटीशन दाखल करायला आंबेडकरी समाजाला सांगुन सुध्दा आजपर्यंत एकानेही फौजदारी पीटीशन दाखल केली नाही, ही शोकांतिका आहे.*
*अखेर विनोदकुमार खोब्रागडे यांनीच दाखल केली फौजदारी पीटीशन.*
*इतिहास भुलने वाले*
*नया इतिहास बना नही सकते.*
*लोक जागृत होणे आवश्यक आहे,अन्यथा येणारा काळ खूप वाईट आहे.*
*काही लोक मला फोन करुन विचारतात, पटवारी साहेब चंद्रपूर जिल्ह्यात,नागपूर जिल्ह्यात,पुणे जिल्ह्यात,किंवा इतर ठिकाणी आपल्या समाजाविरुद्ध विपरीत घडले तरी तुम्ही फौजदारी पीटीशन वरोरा न्यायालयात कशी काय दाखल करता.????*
*त्यांना माझे सांगणे आहे,की आम्ही प्रथम भारतीय नागरिक आहोत.जल,जंगल,जमीन,ही राष्ट्रीय संपत्ति आहे,ते वाचविणे जितकी सरकारची जबाबदारी आहे,तितकीच नागरिक म्हणून माझीही जबाबदारी आहे,आणि तुमची सुद्धा जबाबदारी आहे,मिडीयात आलेली बातमी,न्युज पेपरला आलेली बातमी हा पुरावा होतो,*
*मी अधिकार वाणिने बोलतो,लिहतो,पीटीशन दाखल करतो,कारण मी करुन दाखवले आहे,आपण ???चुपचाप पाहत राहतात.हा जमीन आसमानचा फरक आहे.आपण सुद्धा अशा फौजदारी रिपोर्ट पुण्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस ठाण्यात दाखल करावे .कोणतेही आरोपी यापुढे असे ग़ैरकयदेशीर काम करणार नाही धन्यवाद.*
*जनहीतार्थ जारी.*
*समाजहीतासाठी.*
*देशहितासाठी.*
*राष्ट्रनिर्माणसाठी.*

*अपीलार्थी.*
*विनोदकुमार खोब्रागडे दबंग तलाठी,जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याच्या* *अभ्यासक,रा.वरोरा-चंद्रपूर.*
*मो.9850382426*
*8329423261.*